राज्यात लवकरच शिक्षक भरती : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात शिक्षण विभागात शिक्षक भरती होणार आहे. ट्विट करुन वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
राज्यातल्या शिक्षण विभागात एकूण २ हजार ६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. यामध्ये शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी ३ हजार ९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत घोषणा केली की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५९१ खाजगी व्यवस्थापनाच्या २ हजार ६२ रिक्त पदांसाठी १५ हजार १२३ पसंतीक्रमावर ३ हजार ९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share