हिंदू हितचिंतकांनी दिले राष्ट्रपतींना निवेदन

देवरी दिवसेंदिवस जम्मू – काश्मीर, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील हिंदू समाजातील बंधू- भगिनींची होत असलेली हत्या तसेच अन्याय आणि अत्याचार या विरोधात देवरी येथील हिंदू हितचिंतकांनी स्थानिक तहसीलदार मार्फत भारत देशाचे महामहीम राष्ट्रपतींना योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी निवेदन पाठवले आहे.
सदर जम्मू – काश्मीर, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील विविध भागात अनेक शतकांपासून हिंदू समाज हा शांतस्वभावाने राहत असून आपली दिनचर्या पण शांत रितीने करीत आहे. परंतू , शांत संयमी स्वभावाचे असलेल्या हिंदू समाजाचा गैरफायदा काही समाजकंटक घेऊन तेथील हिंदू समाजाला लक्ष्य करुन तथा टिपून आजपर्यंत अनेकांची हत्या केली. तर, काहींना मानसीक त्रास देऊन दिवसेंदिवस अन्याय आणि अत्याचाराला बळी पाडत आहेत. त्यामुळे, तेथील हिंदू समाजाला नको त्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
या सर्व बिंदूचा विचार करुन दोषींवर कारवाई करण्यासाठी इतर तालुक्याबरोबर देवरी तालुक्यातील सुद्धा हिंदू हितचिंतकांनी राष्ट्रपतींना स्थानिक तहसीलदार मार्फत निवेदन पाठवले आहे.
यावेळी विष्णूप्रसाद अग्रवाल, कौशल्या कुंभरे, राजकुमार शाहू , पवन अग्रवाल, लोकनाथ तितराम, संजय निखारे, जितेंद्र रहांगडाले, सुरेश चन्ने, निखील शर्मा आदी अनेक बंधू उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share