विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तिघांचा मृत्यू : चामोर्शी तालुक्यातील घटना

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राममोहनपुर येथे काल १४ सप्टेंबर रोजी विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. रामकृष्ण विश्वास यांनी आपल्या शेतातील मच्छी खड्डा असलेल्या ठिकाणी तार पसरून त्याला विद्युत करंट लावले होते. परंतु ते त्याच्या मुलाला माहित नसल्याने राजू रामकृष्ण बिश्वास (१८) रा. राममोहनपुर व वीर कुमार सुभाष मंडल (१४) हे दोघे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शेतात गेले असता विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच गतप्राण झाले. सायंकाळी हे दोघे घरी परत न आल्याने शेतावर शोधाशोध केला असता शेतात दोघेही गतप्राण झाल्याचे दिसल्याने कमल आपल्या नातवाला पाहून त्याच्या अंगावर जाऊन पडली. दरम्यान जिवंत विद्युत प्रवाह सुरू असल्याने तीही जागीच गतप्राण झाली.
सदर घटनेची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून शव ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे शवविच्छेदनाचा करिता आणण्यात आले असून पुढील तपास आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक जंगले व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share