१८ वर्षांवरील सर्वांना लस; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर देशात १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती.

दरम्यान आज केंद्र सरकारने याबाबतची घोषणा करताना १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल असे जाहीर केले. याबरोबरच लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share