जंगलातील वनव्यामुळे वातावरणात धुराचे साम्राज्य

देवरी 29: गोंदिया जिल्हा जंगल आणि डोंगरांनी व्याप्त असून वनसंपदेने नटलेला आहे. परंतु उन्हाळ्यात हिच वनसंपदा वणवा पेटून आगीत नष्ट होत असल्याच्या घटना दरवर्षी घडतात. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे जंगल क्षेत्रात मोठया प्रमाणात वणवा लागला आहे. परिणामी वणव्यामुळे वातावरणात धुराचे साम्राज्य झाले असून श्वसनासबंधी आजार , खोकला वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. सकाळी आणि रात्री वातावरणात धुराचे प्रमाण वाढले दिसून आले आहे. वनसंपदा सुरक्षेसाठी आता वनविभागापुढे आव्हान राहणार असून ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share