गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा

आमगाव 04: गोंदिया जिल्ह्यातील भाजपाच्या नवनिर्वाचित जि.प, प. स.,व न.प सदस्यांच्या सत्कार समारंभ आमगाव तालुक्यातील श्री लक्ष्मणराव मानकर शैक्षणिक सभागृहात भाजप च्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर , विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ परिणय फुके, डॉ उपेंद्र कोठेकर,श्रीकांत भारती क्षत्रिय प्रदेश संघटन मंत्री, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, हेमंत पटले, भेरसिंह नागपुरे, भजनदास वैद्य, रमेश कुथे, खोमेश रहांगडाले, संजय कुलकर्णी, बाळा अंजनकर इत्यादी उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संपर्क, सेवा, संघर्ष या तीन मंत्र आचरणात आणण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी एक मिनिट मौन पाळून आविष्कार रहांगडाले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बाळा अंजनकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

सध्या महाराष्ट्रात जे आघाडीचे शासन सुरू आहे, तो सर्व महाराष्ट्राला लाजवणारा आहे . त्यामूळ एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही तर त्यांना जाब विचारणारच .महाराष्ट्राची स्थिती भयंकर वाईट आहे.याला कारण हे आघाडीचे सरकार असून खरतर ते टोळीचे राज्य आहे असे जनतेला वाटू लागले आहे , असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share