राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढला;राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Breaking: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरुच असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे . राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे . राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे . गेल्या आठवड्यापासून राज्यातील रुग्णसंख्या स्थिर आहे . मुंबई , ठाणे आणि पुणे या महानगरांतील रुग्णसंख्या किंचित घटली आहे . तथापि , नाशिक , नागपूर जिल्ह्यांतील रुग्णसंख्येचा आलेख कायम चढता आहे . एकीकडे मुंबई , पुणे या शहरी भागातील रुग्णसंख्या घटली असली तरी ग्रामीण महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचे चित्र आहे .

Print Friendly, PDF & Email
Share