झालं इलेक्सन, जपा रिलेशन

गुलाल कुणाचाही असो, सर्व माणसं आपल्याच गावातील आहेत, आपलीच आहेत. कोणताही विजय किंवा पराजय हा अंतिम नसतो, शांत रहा संयमी रहा. मागील 15 दिवसात ज्या लोकांना हात जोडत होता त्यांना त्रास होईल असे न वागता, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राग, विरोध, द्वेष विसरून एक होणे गरजेचे आहे. आपल्या कर्तृत्वाने प्रभुत्व निर्माण होईल, नि नेतृत्वाची धुरा नक्कीच तुमच्या हातात येईल, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. म्हणूनच ‘झालं इलेक्शन, आता जपा रिलेशनं’ हे ध्यानात ठेवून सर्वांगीण विकासासाठी भविष्यात एकत्र येण्याची गरज आहे. ती प्रत्येकानेच गावात जपली पाहिजे.

Print Friendly, PDF & Email
Share