आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील 3 चिमुकल्यांनी केली डेल्टा प्लस विषाणूवर मात

रत्नागिरी 29 -महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये आटोक्यात आल्याने महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाचा नवा विषाणू म्हणजेच डेल्टा प्लस हा डोकं वर काढत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नुकतच आयसीएमआरच्या प्रमुखांनी डेल्टा प्लस हा विषाणू धोकादायक नसल्याचं सांगितलं होतं. तसेच याबाबतचा संशोधन करून अहवाल केंद्र सरकारला दिल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील तीन चिमुकल्यांनी डेल्टा प्लस या विषाणूवर मात केल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share