मोदी सरकारने सात वर्षात देशाला देशोधडीला लावले : भंडारा शहर काँग्रेसचा आरोप

भंडारा 30- केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन आज सात वर्षे पूर्ण झाले असून मोदी सरकारने सात वर्षात देशाला देशोधडीला लावले अशी टीका भंडारा काँग्रेस कमिटी द्वारे करण्यात आली आहे.

भंडारा शहरात बस स्टॅन्ड जवळ केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय आंदोलन काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारा मोदी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मागील सात वर्षात मोदी सरकारने केलेल्या जीएसटी, शेतकरी विरोधी कृषी कायदा, नोटाबंदी अश्या अनेक निर्णयाविरोधात भंडारा काँग्रेस कमिटीने रोष व्यक्त केला. येणाऱ्या सर्व निवडणुकांत जनता ह्या जुलमी भाजप सरकारला आणि नरेंद्र मोदी यांना त्यांची जागा दाखवणार आहे असे मत भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी व्यक्त केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें