राखी सावंत ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये सहभागी न होण्याचं कारण….

[ditty_news_ticker id=”3552″]

बिग बॉस १४’ मध्ये निरनिराळ्या प्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. कार्यक्रमातून बाहेर आल्यापासूनच राखी आपल्या वागण्याने समोरच्याला आश्चर्यचकित करत असते. चाहतेही राखीच्या बोलण्याने चकित होत असतात. राखी नेहमीच तिचं मत स्पष्टपणे मांडत आली आहे. परंतु, कधीकधी ती असं काही बोलते की समोरचा विचारात पडतो. ‘नुकताच राखील ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये सहभागी न होण्याचं कारण विचारण्यात आलं. त्यावर राखीने चक्क रुबीना दिलैकमुळे आपण कार्यक्रमात गेलो नसल्याचं म्हटलं आहे.

नुकतंच राखीला मुंबईत स्पॉट केलं गेलं. जेव्हा राखीला विचारण्यात आलं की, ‘बिग बॉस १४’ चे अनेक स्पर्धक कार्यक्रमाचाही भाग असूनही तिने स्वतःला ‘खतरों के खिलाडी ‘ पासून दूर का ठेवलं आहे? यावर राखीने दिलेल्या उत्तराने अनेकांची मनं जिंकली तर अनेकांना हसू फुटलं. राखी म्हणाली, ‘अरे बाबा, मला नाही जायचंय तिथे. रुबी नाहीये ना तिथे, काय माहित तिकडे गेली तर माझं पुन्हा अफेअर होईल. तुम्हाला माहित नाही. अभिनव आहे ना तिकडे आणि रुबीना नाहीये. पण हा आणखी एक अडचण आहे तिथे, कोण आहे? निक्की तांबोळी. निक्कीचाचा पण डोळा आहे अभिनववर. मला काय माहित नाहीये का? अभिनय आधीपासूनच छान आहे, मजबूत आहे, चांगला मुलगा आहे,वागायला गोड आहे.’

राखीच्या या उत्तराने अनेकांना हसू फुटलं होतं. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रुबीनाने राखीवर निशाणा साधत तिच्या अभिनवबद्दल असलेल्या भावनांवर राग व्यक्त केला होता.

Print Friendly, PDF & Email
Share