विजवितरण कंपनीच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

मृत व्यक्तिच्या कुटुंबीयांचा आरोप

प्रतिनिधी

देवरी २३: चिचगड पासुन १२ कि अंतरावर पलसगाव येथिल ओमप्रकाश हरिभाऊ वाढई वय ४२ या व्यक्तिने काल दि.२२-२-२०२१ ला घरीच छताला दोर बाधुंन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मागे १मुलगी व १मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे.

विद्युत विभागाचे चक्करा मारुन सदर व्यक्ति कंटाळला होता असा कुटुंबीयांचा आरोप आहे. १५ एकर जमिनीवर त्याने रब्बी लावली होती तसेच विद्युत पोलसाठी डिमांड भरला होता तो त्या साठी रोज देवरी ला येत जात होता आणि विद्युत विभागातिल अधिकारी त्याला वारंवार फिरवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रबी पिकाची पाण्याविणा परिस्थिति खालावत गेल्यांने त्याने ही टोकाची भुमिका घेतली असे मृत व्यक्तिचे मोठे भाऊ खेमराज वाढई यांनी सांगितले.


सदर घटनेची सखोल चौकसी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणीकुटुंबीयांनी केली आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक फौजदार होरे आणि पो.ना विजय सलामे करित आहेत.

प्रहार टाईम्सच्या प्रतिनिधीनी देवरी विद्युत विभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क केले असता सदर व्यक्तिने विद्युत पोलची मागणी केली होती आणि डिमांड पण भरला असल्याचे सांगतले. ५ पोल चा सर्वे करण्यात आला असल्याचे सबंधित अधिकाऱ्यानी सांगतले .

Print Friendly, PDF & Email
Share