पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना राबवित नवयुवक किसान गणेश मंडळाने बांधला बंधारा

◼️जल हेच जीवन संदेश देत बांधला फुटलेला बंधारा

देवरी 26: देवरी चा राजा म्हणून ओळख असलेल्या राज्यशासन पुरस्कृत नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी यावर्षी 55 वे वर्ष साजरे करीत आहे . त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे , संजय बळगाये, भोयर, लेखराम निर्वाण , रवी भोयर, किशोर बगळे, अजित बघेले, आदी पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करून सामाजिक दायित्व जपले. सदर उपक्रमाच्या यशासाठी मंडळाचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share