वैनगंगा नदीच्या तिरावर गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयावर संदीप कदम यांच्या हस्ते जलपूजन

भंडारा : शासनामार्फत 16 ते 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे अध्यक्षतेखाली व मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प जलसंपदा विभाग नागपूर आशिष देवगडे यांचे प्रमुख उपस्थितीत वैनगंगा नदीच्या तिरावर गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयावर भंडारा येथे पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ. तु. देवगडे, मुख्य अभियंता, गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा विभाग, नागपूर यांनी असे संबोधित केले की, गोसीखुर्द जलाशय हे भंडारा शहराच्या बाजूला असून भंडारा शहरामधून होत असलेले पाणी प्रदुषण रोखण्याकरीता, नगर परिषद भंडारा यांनी जलजागृती करण्याची आवश्यकता नमूद केली.गोसीखुर्द जलाशयाचे प्रदूषण हे फक्त नाग नदी वरुनच होत नसून त्यामध्ये इतर घटक सुध्दा प्रदुषण करतात. नागनदीच्या प्रदूषणाबाबत शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. या करिता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 14 मार्चला वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गोसीखुर्द जलाशय प्रदूषणमुक्त करण्याकरिता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे गोसीखुर्द जलाशयातील पाण्याचे प्रदूषण रोखून जलाशय स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी त्यांचे अध्यक्षीय भाषणात पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असूनही प्रत्यक्ष वापरा योग्य पाणी अत्यंत कमी प्रमाणात आहे. याला कारण म्हणजे जलस्त्रोताचे होत असलेले प्रदूषण. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर होणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच पाण्याचे प्रदुषण न करता गुणवत्ता राखणे महत्वाचे आहे. जलसंपदा विभागाबरोबरच पाण्याशी प्रत्यक्ष संबंध येत असलेल्या इतर विभागाचा सहभाग घेवून जास्तीत जास्त जलजागृती होईल यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
ज. द. टाले, अधीक्षक अभियंता यांनी जलजागृती सप्ताहाचे उद्दीष्ट स्पष्ट केले. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचनामध्ये पाणी वापर संस्थेमार्फत लोकसहभाग वाढविणे, कमी पाण्यात जास्त सिंचन करणे, जलसंधारणा मार्फत भुजल पातळी वाढविणे, कृषी विभागा मार्फत पिक पध्दती बाबत प्रबोधन करणे, पाणी प्रदूषण टाळणे व उपसा सिंचन योजनेमध्ये विज बिल व मशिनरी देखभाल दुरुस्ती करीता सिंचन पाणी पट्टी भरणे बाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे या बाबी नमुद केल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना अ. वि. फरकडे, कार्यकारी अभियंता यांनी केली यामध्ये त्यांनी 16 ते 22 मार्च दरम्यान या सप्ताहात जलसंपदा विभागाद्वारे लोकसहभागातून घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा मांडली.
कार्यक्रमाचे शेवटी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी संदीप कदम व मुख्य अभियंता आ. तु. देवगडे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात केली.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य अभियंता गोसीखुर्द प्रकल्प, जलसंपदा आ. तु. देवगडे, ज. द. टाले, अधीक्षक अभियंता, अ. वि. फरकडे, कार्यकारी अभियंता, रा. गो. शर्मा, कार्यकारी अभियंता, प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंता सुहास मोरे, कार्यकारी अभियंता, संदीप सातपुते, कायर्कारी अभियंता, रविंद्र बानुबाकोडे, कार्यकारी अभियंता, उल्हास फडके, मिलिंद जोशी, जलकल्याणकारी समिती तसेच कृषी विभागाचे अधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share