सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले, सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे.

आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुले ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमीत चर्चा होत असते. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे कठीण होता असंही ते म्हणाले होते.
शाळा सुरु करतांना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करतांना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवर्जून सांगितले होते.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या.पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. शिक्षकांना बरे वाटत नसेल आणि शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी अशी सर्व पालक आणि शिक्षकांना या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विनंती केली होती.

Print Friendly, PDF & Email
Share