Mumbai: यंदा पासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह मंत्री गणांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह; व्याख्याने, लोककलांच्या अविष्काराच्या भरगच्च कार्यक्रमांसाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या वर्षी थेट शासनाच्या सहभागातून गणेशोत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.








