रोहित्र जळाल्याने रब्बीतील धान पिके संकटात

देवरी ⬛️ तालुक्यातील मुल्ला (छत्तरटोला) येथील कृषिपंपासाठी लावलेले रोहित्र आठ दिवसांपूर्वी जळालेले आहे. तर नवीन रोहित्र लावल्याने या परिसरातील शेतकर्‍यांचे रब्बी धानपीक संकटात आले आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत मुल्ला छत्तरटोला क्षेत्रातील शेतकर्‍यांनी शेतात रब्बी हंगामातील धान पिकासाठी बोअरवेल, विहीर खोदली आहे. महावितरणकडून वीज वीजजोडणी घेतली आहे. अनेक स्थानिक शेतकर्‍यांनी शेतात उन्हाळी भातपिकाची लागवड केली आहे. परंतु, मागील आठ दिवसांपूर्वी यांत्रिक बिघाडामुळे हे रोहित्र जळाले. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत असल्याने धान पिकाला पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शेतकर्‍यांनी मुलला येथील शाखा अभियंत्यांना अर्ज करुन लवकरात लवकर नवीन वीजरोहित्र बसविण्याची मागणी केली आहे. तसेच तातडीने वीजरोहीत्र न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share