बातमी प्रकाशित होताच बस फेऱ्यांच्या वेळेत बदल , आता शालेय विद्यार्थी वेळेवर पोहचणार !

◼️अनियमीत बसफेर्‍यांनी शालेय विद्यार्थ्यांचे बेहाल, शैक्षणिक तासिकांचे वाजले तीनतेरा मथड्याखाली ‘प्रहार टाईम्स’ च्या बातमीची दखल

देवरी 21: तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठा गाजावाजा करत बस सेवा सुरु करण्यात आली परंतु अनियमित बस फेऱ्यांमुळे ओवारा , लोहारा , सावली , चारभाटा , मुल्ला ग्रामीण भागातून देवरी शहरात विद्यार्थ्यांना शालेय वेळेत पोहचविण्यासाठी वेळ होत होता . त्यामुळे शालेय तासिका बुडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

बातमी प्रकाशित होताच सदर समस्यांवर उपाय काढण्यात आला असून आमगाव हून सकाळी 6.45 वाजता सुटणारी नागपूर बसच्या वेळेत बदल करण्यात आले असून सकाळी 6.15 वाजता बस सुटणार असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सुट्टीच्या वेळेवर होणारी समस्या लवकरच सोडण्याच्या येणार असल्याची माहिती मिळाली.

Print Friendly, PDF & Email
Share