ब्रेकिंग : अखेर सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव वाढत असल्याने अखेर राज्य सरकारने सोमवारपासून सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

याबाबत शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळा सुरू कराव्यात असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share