अखेर 39 वर्षानंतर झाली स्वप्नपूर्ती…गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण क्षमतेनी भरला

गाठली 245.500 मीटर ची पातळी

भंडारा : राष्ट्रीय प्रकल्प म्हणूनणू ओळख असलेल्या महत्त्वाकांक्षी अशा गोसीखुर्द प्रकल्पाचे पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 10 जानेवारी 2022 रोजी प्रकल्प 245.500 मीटर या त्याच्या पूर्ण क्षमतेने भरल्याने तब्बल 39 वर्षानंतर अपेक्षापूर्ती झाली आहे.भंडारा,नागपूर आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमधील शेतीसाठी संजीवनी ठरणाऱ्या गोसीखुर्दखुर्द प्रकल्पाची पायाभरणी 1983 साली भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीवर झाली.अडीच लाख हेक्टर शेतीचे सिंचन करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडून शेतकऱ्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र विविध अडचणींचा सामना करीत तब्बल 39 वर्षानंतर हा प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळपास पोहोचला आहे. काही ठिकाणी भूसंपादन आणि पुनर्वसनाचे लहान मोठे काम शिल्लक असल्याने शंभर टक्के प्रकल्प पूर्ण झाला असे म्हणता येत नाही.मात्र प्रकल्पाने आज तो ऐतिहासिक पल्ला गाठला आहे.
या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 245.500 एवढी आहे. मागील काही वर्षांपासून प्रकल्प पाणी साठवले जात होते.ते काही अंशी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून सिंचनाचे काम आहे.सुरू झाले आहे. मात्र पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प अजून पर्यंत भरलेला नव्हता. प्रकल्पातील पाणी साठा वाढला की त्याच्या बॅकवॉटर मुळे प्रभावित होणार्‍या बाबींचा विचार करून हे पाणी धरण प्रशासनाकडून
आणण्यात येत होते.ते मात्र 10 जानेवारी पर्यंत प्रकल्प आपली सर्वोत्तम पातळी गाठेल असेही सांगण्यात आले होते.ते आज सकाळी प्रकल्पाने ती सर्वोच्च असलेली 245.500 मीटरची पातळी गाठली आणि अनेक वर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपली. पूर्ण क्षमतेने प्रकल्प भरल्याने ही याचे दुष्दुपरिणाम काही अंशी नदीकाठावरील आणि बाधित क्षेत्रातील नागरिकांना सहन करावे लागणार आहेत
परंतु अंतिम क्षमते पर्यंत पाणी साठवून सर्वेक्षण करणे ही प्रशासनाच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे आहे.या प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील 104 गावे तर नागपूर जिल्ह्यातील 79 गावे बाधित होणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील 12475 हेक्टर पैकी 12331 हेक्टर जमिनीचे संपादन सुद्धा झाले आहे. तर नागपूर जिल्ह्यातील 33.26 हेक्टर पैकी 27.96 हेक्टर तर चंद्रपूर जिल्ह्यातील 2682 पैकी 2632 हेक्टर जमिन संपादित करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील 89856 हेक्टर, नागपूर 19481 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41463 हेक्टर जमिनीचे सिंचन या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. या प्रकल्पाचे डावा आणि उजवा असे दोन कालवे असून उजवा कालवा 99 किलोमीटरचा तर डावा 22.93 किलोमीटरचा आहे. या कालव्याच्या माध्यमातून तीनही जिल्ह्यातील
शेती पर्यंत पोहोचविण्याचे काम हा प्रकल्प करणार आहेत. मागील 39 वर्षापासून या प्रकल्पाचे सुरू असलेले काम शंभर टक्के पूर्ण झाले असले तरी काही प्रमाणात सिंचन करू शकेल एवढी क्षमता या प्रकल्प नक्कीच प्राप्त केली आहे. आता 100 टक्के क्षमतेने हा प्रकल्प भरला असल्याने नक्कीच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे यामुळे बाधित होणाऱ्या लोकांच्या अडचणीचा विचार करणेही प्रशासनाला तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share