महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची उद्यापासून होणार कोरोना चाचणी

प्रहार टाईम्स

मुंबई १६:- राज्यातील सरकारी , अनुदानित तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या नववी ते बारावी पर्यंत सर्व शाळा आणि त्यांचे वर्ग २३ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहेत.या पार्श्वभूमीवर मंगळवार ( १७ नोव्हेबर पासून राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचा – यांची कोविंड -१ ९ अर्वात कोरोना चाचणी केली जाणार आहे .राज्यात २४ जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने सुरू होते , परंतु राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

विशेष म्हणजे , ‘ मिशन बिगिन अगेन ‘ अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्याटप्याने सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत . त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून , त्यानुसार येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत . कोविड -१ ९ अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड करण्याचे आणि त्यासाठीच्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . या आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर यादरम्यान कोविड -१ ९साठीची आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे . शाळा व्यवस्थापनाने त्याची पडताळणी करावी आणि त्यानंतरच त्यांना शाळांमध्ये प्रवेश द्यावा , असेही त्यात नमूद करण्यात आले आहे . मंगळवारपासून सुरू होत असलेल्या कोविडच्या चाचणीनंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना शाळा आणि परिसरात येण्यास मज्जाव केला जाणार आहे . तसेच त्यांना डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहण्याची मुभा दिली जाणार आहे . यासाठी सर्व खबरदारी घेण्याची जबाबदारी शाळा मुख्यध्यापकांवर सोपवण्यात आली आहे .

Print Friendly, PDF & Email
Share