तहसीलदार बदलले मात्र अपिलिय अधिकारी जुनेच?

स/अर्जुनी : तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथील तत्कालीन तहसीलदार बदलून जवळपास दोन महिन्याचा कालावधी झाला. नव्या तहसीलदारांनी पदभार स्वीकारला मात्र जनमाहिती अधिकारी यांचे नाव अद्याप फलकावरून बदलेले नाही. जुन्याच तहसीलदारांचे आजही नाव फलकावर लिहिले असल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तत्कालीन तहसीलदार किशोर बागडे हे होते त्यांची बदली होताच नव्याने रुजू झालेले तहसीलदार गणेश खताडे हे आहेत.

माहिती अधिकार कायदा २००५ हा केंद्राचा कायदा असला असून सदर कार्यालयाच्या एका कोपऱ्यात सदर फलक ठेवलेला असल्याचे चित्र आहे. माहिती अधिकाराचे फलक दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे.

Print Friendly, PDF & Email
Share