सावधान! देवरी महामार्गावर अनधिकृत ट्रक पार्किंगमुळे सर्वसामान्याच्या जीवाला मोठा धोका?

◾️शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांची वाढली चिंता, प्रशासन उदासीन

प्रहार टाईम्स |डॉ. सुजित टेटे
देवरी 28: राज्यात गेल्या सहा महिन्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघात संख्या सुमारे 25 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अपघातांसह त्यात मृत्यूपावणार्‍या प्रवाशांचा आकडा तब्बल 28 टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी शहरातून महामार्ग 6 (मुंबई ते कोलकाता) गेलेला असून RTO चेक पोस्ट असल्याने मोठ्या प्रमाणात जळवाहनांची वरदळ असते. राष्ट्रिय महामार्गावर देवरी शहर वसलेले असून मुख्य बाजारपेठ , शाळा , महाविद्यालये आणि शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी , मजूर , कामगार आणि सर्वसामान्य नागरिक शहरात हजेरी लावत आहेत. शहराच्या मधोमध गेलेल्या महामार्गवर उभे असलेल्या अनाधिकृत पार्क केलेल्या ट्रक व जळवाहनांमुळे महामार्गावरून येणारे जाणारे वाहन दिसत नसल्यामुळे जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

प्रामुख्याने देवरीचे मुख्य चौक असलेले अग्रसेन चौक, बस स्टाप, चिचगड चौक, पोस्टऑफ़िस, बैंक ओफ बदोडा, स्टेटबैंक, बैंक ओफ इंडिया , कनेरा बैंक, पंचायतसमिती, तहसीलकार्यालय, शाळा महाविद्यालये , नगरपंचायत परिसरात सर्वात जास्त अनियंत्रित वाहतूक आणि अनधिकृतपणे उभे असले ट्रक व जडवाहनामुळे अपघाताचे चित्र बघावयास मिळते. विशेष म्हणजे देवरी हे सर्व सर्रास घडत असून सुद्धा सबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्यमुळे विद्यार्थी, नोकरदार, महिला, मजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील लोक तालुक्याच्या ठिकाणी कृषीविषयक साहित्य आणि जीवनोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी देवरी येथील बाजारपेठेत हजेरी लावतात. त्याच बरोबर महामार्गावरील वरदळ देखील वाढलेली असून बेजबाबदारपणे भर रस्त्यावर ट्रक व जडवाहने उभी केली जात असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.

बँक, पोस्ट ऑफिस , तहसील कार्यालये महामार्गावर असल्यामुळे याठिकाणी नेहमीच मोठीगर्दी असते. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या अपघातापासून जिव वाचविण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. प्रशासन कुठलीही जबाबदारी स्वीकारत नसल्याचे चित्र दिसून येते.

देवरी येथे हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येतात शाळा, महाविद्यालये सुरु झालेले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये य दृष्टीने पालक आपल्या पाल्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठविण्यास उत्सुक आहेत. परंतु देवरी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा रस्ता दुभाजकाला लागूनच मोठे जडवाहने उभी केली जात असल्याचे स्पष्ट चित्र असून महामार्ग ओलांडताना येणारे जाणारे वाहन अजिबात दिसत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share